शनिवार, ३१ जुलै, २०२१

लोकशाहिर अन्नभाऊ साठे यांची आज जयंती निमित्त विशेष लेख

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                        

   

    *साहित्यरत्न लोकशाहीर*   

          *अण्णाभाऊ साठे*


     *जन्म :  १ ऑगस्ट, १९२०*

(वाटेगाव,ता.वाळवा,जि. सांगली) 

        *मृत्यू :  १८ जुलै, १९६९*

                ( गोरेगाव, मुंबई )


जन्म नाव -) तुकाराम भाऊराव साठे

टोपणनाव -) अण्णाभाऊ साठे

शिक्षण -) अशिक्षित

राष्ट्रीयत्व -) भारतीय 

कार्यक्षेत्र -) लेखक, साहित्यिक

भाषा -) मराठी

साहित्य प्रकार -) शाहिर,कथा,कादंबरीकार

चळवळ -) संयुक्त महाराष्ट्र चळवळ

प्रसिद्ध साहित्यकृती -) फकिरा

प्रभाव -) बाबासाहेब आंबेडकर, 

            कार्ल मार्क्स

वडील -) भाऊराव साठे

आई -)  वालुबाई साठे

पत्नी -) कोंडाबाई साठे,

           जयवंता साठे

अपत्ये -) मधुकर,शांता आणि शकुंतला


            तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.

       कथा,कादंबरी,लोकनाट्य,नाटक,पटकथा,लावणी,पोवाडे,प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे,तर आईचे नाव वालबाई होते.त्यांचे मूळ नाव तुकाराम.जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा,जि.सांगली).त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले.१९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे,मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी,अशी मिळतील ती कामे त्यांनी केली.मुंबईत कामगारांचे कष्टमय,दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले.त्यांचे संप,मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला.१९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.

        मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली.पक्षाचे कामही ते करीत होतेच;तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर,पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले.तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले.पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले.पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले.मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले.त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला.त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला;  त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ?  ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

         उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.

          अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’,असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता.मानवी जीवनातील संघर्ष,नाटय,दुःख,दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते.त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते.त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझाली.त्यात बाबूराव बागूल,नामदेव ढसाळ,लक्ष्मण माने,यशवंत मनोहर,दया पवार,केशव मेश्राम,शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.

        अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा,रांगडा पण लोभस घाट आहे.नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण.ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो.लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.

         रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

          पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.


महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी निमित्त विशेष लेख

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’* अशी घोषणा करणारे *लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..*

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

पूर्ण नाव -)  बाळ गंगाधर टिळक

जन्म तारीख -) २३ जुलै १८५६

           रत्नागिरी, महाराष्ट्र

वडिलांचे नाव -) गंगाधर रामचंद्र टिळक

आईचे नाव -) पार्वती बाई गंगाधर

पत्नीचे नाव -) तापीबाई (सत्यभामा बाई) १८७१

मुलांची नावे -) रमा बाई वैद्य, पार्वती बाई केलकर,

विश्वनाथ बलवंत तिलक, रामभाऊ बलवंत तिलक,

श्रीधर बलवंत तिलक और रमाबाई साणे

शिक्षण -) बी.ए. एल.एल. बी

पुरस्कार -) ‘लोकमान्य’

मृत्यू -) १ ऑगस्ट १९२०

              मुंबई, महाराष्ट्र

पॉलिटिकल पार्टी -) इंडियन नॅशनल कॉंग्रेस


टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला.तर मृत्यू १ आॕगष्ट १९२० रोजी मुंबई,महाराष्ट्रात झाला स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र १९ व्या वर्षी निवर्तले. १६ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न १७ व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. १८७६ साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली. 


महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच २ जानेवारी १८८० ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. 




टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.


टिळकांनी गणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी वसपीठ निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव त्या अनुषंगाने व्याख्याने, मेळे, लेझीम, पथके आदींमुळे लोक एकत्रित येऊ लागले. त्यापुढे जाऊन ‘शिवजयंती’ सार्वजनिक स्वरूपात सुरू केली. हे महत्त्वाचे पाऊल टिळकांनी उचलले. आपली भूमिका या उत्सवाच्या रूपाने केसरीतून व्यक्त केली. ‘राष्ट्रपुरूषाचे स्मरण’ व त्यातून कृतज्ञता व्यक्त करणे. महापुरूषाचे चरित्र सर्वसामान्यार्पंत पोहोचवणे हा असा हेतू स्पष्ट केला. १८७६-७७ साली पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने ‘फॅमिन रिलिफ कोड’ पास केला. त्याचे मराठी भाषांतर पुस्तिका रूपाने ‘कर्ज काढून सारा भरू नका’ या वाक्याने ठाणे-कुलाबा येथील कार्यकर्त्यांवर खटले भरले. काद्याच्या चौकटीत राहून सरकारवर दबाव आणणे हे कार्य टिळकांनी प्रभावीपणे केले. पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची आपत्ती आली. सरकारने रँड या अधिकार्‍याची नेमणूक केली. पण हा अधिकारी म्हणजे कर्दन काळ ठरला. रँडचा खून चाफेकर बंधूंनी केला. टिळकांनी अग्रलेख लिहिला. ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ याबद्दल टिळकांना १८ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. 


१९०७ मध्ये सुरतला काँग्रेसचे अधिवेशन झाले. तिथे जहाल व मवाळ गट असे होऊन अधिवेशन उधळले गेले. टिळकांनी तरुणांना साहसी कृत्ये न करण्याची, किंग्ज फोर्डला धडा शिकविण्याचा सल्ला दिला. पुढे पां. म. बापट यांनी बॉम्बचे मॅनुअल बंगालमधील तरुणांना मिळाले. त्याचे पडसाद उमटले. शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना ६ वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला. 


मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणजेत मालवली. 


*‘दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती'*

**********************************

संकलन -) गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,भरणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०१ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *"किसी व्यक्ति को प्रशंसा मिलने पर अहंकार तभी उत्पन्न होता है जब अमुक व्यक्ति यह भूल जाता है कि प्रशंसा वास्तव में उसकी नहीं अपितु उसके गुणों की हो रही है।"*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या प्रत्येक सूख दुःखात नेहमी खंबीर पणे साथ देणाऱ्या *माझ्या सर्व श्री कृष्णा सारख्या मित्रांना* माझ्या सारख्या सुदामा कडून कोटी कोटी शुभेच्छा,

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपली मैत्री सदैव श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी कायम राहो हिच मैत्री दिनाच्या शुभेच्छा...!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

31 जुलै क्रांतिकारी उधमसींह पुण्यतिथी

 ********************************

*३१ जुलै - क्रांतिकारक उधमसिंह पुण्यतिथी*

********************************


जन्म - २६ डिसेंबर १८९९ (पंजाब)

स्मृती - ३१ जुलै १९४० (लंडन)


सरदार उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक महान सैनिक आणि क्रांतिकारक होते. लंडन मधील जालियनवाला बाग घटनेदरम्यान त्याने पंजाबचा गव्हर्नर जनरल मायकेल ओ'ड्वायर यांना गोळ्या घातल्या. बर्‍याच इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही हत्या पंजाबवर नियंत्रण राखण्यासाठी पंजाबियांना धमकावण्यामागील ओ'ड्वायर आणि इतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केलेली योजनाबद्ध योजना होती. इतकेच नाही तर जनरल डायर यांच्या पाठिंब्याने ओ'ड्वायर यांनी माघार घेतली नाही.


जालियनवाला बाग हत्याकांडासाठी उधम सिंगने जनरल डायर यांना ठार मारलेल्या समान नावामुळे सामान्य समज आहे, परंतु प्रशासक यांना असा विश्वास आहे की एका गोळ्यामुळे उधम सिंग यांचा मृत्यू झाला, तर गोळीबार करणार्‍या जनरल डायरचा अर्धांगवायू आणि विविध आजारांनी मृत्यू झाला.


उधम सिंगचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सुनम गावात झाला. १९०१ मध्ये उधम सिंगच्या आईचे आणि १९०७ मध्ये वडिलांचे निधन झाले. या घटनेमुळे त्याला आपल्या मोठ्या भावासोबत अमृतसर मधील अनाथाश्रमात आश्रय घ्यावा लागला. उधम सिंग यांचे बालपणीचे नाव शेरसिंह आणि त्याच्या भावाचे नाव मुक्तासिंग होते ज्यांना अनाथाश्रमात अनुक्रमे उधम सिंग आणि साधुसिंह असे नावे मिळाली. इतिहासकार मालती मलिक यांच्या मते, उधमसिंह हे देशातील सर्व धर्माचे प्रतीक होते आणि म्हणूनच त्यांनी आपले नाव राम मोहम्मदसिंग आझाद असे ठेवले जे भारताच्या तीन प्रमुख धर्मांचे प्रतीक आहे.


१९१७ मध्ये उधम सिंग अनाथ आश्रमात राहत होता नि त्याच वेळेस त्याच्या मोठ्या भावाचाही तेव्हा मृत्यू झाला. तो पूर्णपणे अनाथ झाला. १९१९ मध्ये त्यांनी अनाथाश्रम सोडले आणि क्रांतिकारकांसह स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. उधमसिंह अनाथ होते, परंतु असे असूनही तो विचलित झाला नाही आणि त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी डायरची हत्या करण्याच्या वचनपूर्तीसाठी कार्य केले.


१३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियांवाला बाग हत्याकांडातील उधम सिंग हे प्रत्यक्षदर्शी होते. जालियनवाला बागेत ठार झालेल्या लोकांची नेमकी संख्या राजकीय कारणांमुळे कधीच उघडकीस येऊ शकली नाही. या घटनेने वीर उधमसिंह 'तिलमिला' येथे गेला आणि मायकल डायरला धडा शिकवण्या साठी जालियनवाला बाग हातात घेतला. 


आपले ध्येय पार पाडण्यासाठी उधमसिंग आफ्रिका, नैरोबी, ब्राझील आणि अमेरिकेच्या विविध नावांनी प्रवास केला. १९३४ मध्ये उधम सिंग लंडनला पोहोचला आणि तेथे ९, एल्डर स्ट्रीट कमर्शियल रोड येथे वास्तव्य केले. तेथे त्याने प्रवासाच्या उद्देशाने एक कार खरेदी केली आणि आपले अभियान पूर्ण करण्यासाठी सहा बुलेटसह एक रिवॉल्व्हर खरेदी केली. मायकेल डायरचा ठावठिकाणा स्थापित करण्यासाठी भारताच्या या वीर क्रांतिकारकाने योग्य वेळी प्रतीक्षा केली.


उधम सिंग यांना १९४० मध्ये शेकडो भावंडांच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी मिळाली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या २१ वर्षांनंतर १३ मार्च १९४० रोजी रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची लंडनमधील कॅक्सटन हॉल येथे बैठक झाली जिथे मायकेल डायर हे देखील भाषक होते. उधम सिंग त्या दिवशीच सभास्थळी पोहोचला. त्याने आपली रिवॉल्व्हर जाड पुस्तकात लपविली. त्यासाठी त्यांनी पुस्तकातील पाने रिवॉल्व्हरच्या आकारात अशा प्रकारे कापली होती की, डायरचे जीवघेणे हत्यार सहज लपू शकेल.


बैठकीनंतर भिंतीच्या मागून उधम सिंगने मायकेल डायरवर गोळीबार केला. मायकल डायरला दोन गोळ्या लागल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. उधम सिंगने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला अटक केली. त्याच्यावर खटला चालविला गेला. 


४ जून १९४० रोजी उधमसिंग हत्येचा दोषी ठरला आणि ३१ जुलै १९४० रोजी त्याला पेंटनविले कारागृहात फाशी देण्यात आली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ३१ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


           *"हर व्यक्ति अपने जीवन मे किसी न किसी व्यक्ति को अपना आदर्श मानता है। किसी को अपना आदर्श बनाना कोई बड़ी बात नहीं है। बड़ी बात तो ये है कि जीवन में आप स्वयं ऐसे अनुकरणीय, सद्कार्य करो कि लोग आपको अपना आदर्श माने।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रात आंधळेपणा म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕


रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.


जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.


रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व 'अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


═══════════════════════

  

रामचंद्र गुप्ते भुशास्त्रज्ञ यांचा जन्म दिवस

 *रामचंद्र भालचंद्र गुप्ते*

🏔️⛰️🗻🌋🏔️🌋🗻⛰️🏔️

*🗻🏔️⛰️भुशास्त्रज्ञ⛰️🏔️🗻*


*जन्मदिन - ३० जुलै १९१९*


प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. तैल व चिकित्सक बुद्धी, त्याबरोबरच भूशास्त्रीय प्रश्‍नांची उकल करण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी भूशास्त्रीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळविले होते. डॉ. गुप्ते खऱ्या अर्थी निरीश्वरवादी होते. त्यांनी अनेक दु:खाचे प्रसंग धीराने पचविले. महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक दु:खद निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला मंत्रालयात झालेल्या ‘कोयना टेमर्स कमिटी’च्या बैठकीतील चर्चेत त्यांनी अविचल मनाने भाग घेतला होता.


पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांना त्या परीक्षेत ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली होती. संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्था (जी.एस.आय.) मध्ये काम केले. त्यानंतर १९६६ सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर व पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले. मार्च १९६६ पासून जुलै १९७७ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व भूशास्त्रीय विभागप्रमुख म्हणून होते.


१९५० सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा ८५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या ‘डेक्कन टॅप’ खडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यात खडकांचे विविध प्रकार, त्यांच्या क्षेत्रीय संरचना, त्यांचे विविध गुणधर्म याविषयी त्यांनी सखोल निरीक्षण व अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्याने माहिती मिळाली. तसेच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संशोधनातील अप्रामाणिकपणा ते कधीच खपवून घेत नसत.


भूशास्त्र या विषयाचा अभ्यास प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या संशोधनाचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकी कामात केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. खडकांच्या विविध गुणधर्मांविषयी त्यांनी जी अचूक माहिती मिळविली होती, त्या माहितीचा अभियांत्रिकी भूशास्त्र समजण्यास फार उपयोग झाला. गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाइक, भरितकुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनांत काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉ. गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यवधी रुपये वाचू शकले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत.


१९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणे, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृहे व पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे व बांधकाम यांविषयी डॉ. गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणीपुरवठ्यासाठी भातसा, मध्य वैतरणा धरण,समुद्राखालील वसई खाडी बोगदा (क्रीक टनेल), केळशी बोगदा (अंडरक्रीक टनेल), सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा व ५० कि.मी. लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा व चौथा टप्पा, पुण्याजवळील पानशेत,वरसगाव,टेमघर,भाभाआसखेड,चासकमान इत्यादी धरणांवर,तसेच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील तिसरे रेल्वे मार्ग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम इत्यादी जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.


नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव व जलसिंधी येथील धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला.


महाराष्ट्र सरकारच्या ‘कोयना ट्रेमर्स कमिटी’ व ‘एक्स्पर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजी’चे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले. हा भूकंप धरणामुळे झाला असणे कसे शक्य नाही हे त्यांनी शोधनिबंध लिहून व विविध चर्चासत्रांत भाग घेऊन दाखवून दिले.


महाराष्ट्र सरकारच्या ‘सिंचन व जल आयोगा’चे सहयोगी तज्ज्ञ म्हणून त्यांनी आयोगाच्या अनेक कार्यशाळांत झालेल्या चर्चेत भाग घेतला व आयोगाला भूजलाच्या भूशास्त्रीय पैलूंविषयी टिप्पण्या तयार करण्यास सहकार्य केले.


भाषा संचालनालयाने मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. परिभाषा तयार करण्याच्या चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी व त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्मांविषयी त्यांचे पंचवीसहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. ‘पी.डब्ल्यू.डी. हँड बुक प्रकरण क्र. ६’, तसेच ‘ए टेक्स्ट बुक ऑफ इंजिनिअरिंग जिऑलॉजी’ व ‘एजी सिरीज ऑफ जिऑलॉजिकल मॅप्स’ ही त्यांची पुस्तके भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात.


भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेले डॉ. गुप्ते कालवश झाल्याने डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला, असेच म्हणावे लागेल.

— डॉ. बा. मो. करमरकर

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏


संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ३० जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शूद्रो ब्राह्मणतामेति 

            ब्राह्मणश्चैति शूद्रताम।

क्षत्रियाज्जातमेवं तु 

            विद्या द्वैश्यात्तथैव च।


*अर्थात मनुस्मृति के अध्याय १०/६५  में महर्षि मनु कहते हैं कि कर्म के अनुसार ब्राह्मण शूद्रता को प्राप्त हो जाता है और शूद्र ब्राह्मणत्व को। इसी प्रकार क्षत्रिय और वैश्य से उत्पन्न संतान भी अन्य वर्णों को प्राप्त हो जाया करती हैं। विद्या और योग्यता के अनुसार सभी वर्णों की संतानें, अन्य वर्ण में जा सकती हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, २९ जुलै, २०२१

गणिती कोडे

 गणितात कोणतीही संख्या 1 ते 10 पर्यंतच्या  सर्व संख्याने भागता येत नाहीत,   पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली...!


ही संख्या - 2520 पहा. ही इतर अनेक   संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण  वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले...!!


ही विचित्र संख्या 1 ते 10 यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही.

ह्या संकटाला 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्याचे रहाते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते...!! 

आता पुढील टेबल पहा, वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.


2520 ÷ 1 = 2520

2520 ÷ 2 = 1260

2520 ÷ 3 = 840

2520 ÷ 4 = 630

2520 ÷ 5 = 504

2520 ÷ 6 = 420

2520 ÷ 7 = 360

2520 ÷ 8 = 315

2520 ÷ 9 = 280

2520 ÷ 10 = 252


2520 या संखेचे रहस्य [ 7 × 30 × 12 ] या गुणाकारात दडले आहे.


भारतीय हिंदू संवत्सरच्या अनुषंगाने या 2520 संखेचे कोडे उलगडते,जे या संखेचे गुणाकार आहे::

ऐक आठवड्यांचे दिवस (7), एका महिन्याचे दिवस (30) व एका वर्षाचे महीने (12)

[7×30×12=2520]

हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व!!


29 जुलै जे आर डी टाटा जन्म दिवस

 ********************************

✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️

*२९ जुलै - जे.आर.डी. टाटा जन्मदिन*

🚗🚕🚙🚌🚑🚒🚐🚚🚛🚗🚕

********************************

🏭🏥🏤🏨🏢✈️🏢🏨🏤🏥🏭

जन्म -  २९ जुलै १९०४ (फ्रान्स)

स्मृती - २९ नोव्हेंबर १९९३


जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते.ते पहिले भारतीय वैमानिक असून,भारतातील✈️ विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.


टाटांचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरिस,फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले,पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले.काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.


इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते.त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला.१९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.१९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली.पुढे १९४६ साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले.


वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन,वाहन,चहा,माहिती,हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. 


टाटांच्या पुढाकाराने १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली.त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.


टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१ साली मुंबईत सुरू केले.


टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

******************************

संकलन -) गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

वडस म्हणजे काय?


══════════════════════

  संकलन

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *वडस म्हणजे काय ?* 📕


वडस हा डोळ्यांचा विकार आहे. तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणाऱ्या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतींमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो.


वडस म्हणजे डोळ्यातील श्लेष्मल आवरणाची एक त्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या वाजूपर्यंत वाढते. बाहुलीवर या पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात.


वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत नसेल, तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार जर वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल, तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


षण्णामात्मनि नित्यानाम्

              ऐश्वर्यं योऽधिगच्छति।

न स पापैः कुतोऽनर्थै:

              युज्यते विजितेन्द्रियः॥


भावार्थः-  *जो व्यक्ति मन के अंदर रहने वाले काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार तथा ईर्ष्या नामक छह शत्रुओं को जीत लेता है, वह जितेंद्रिय हो जाता है। ऐसा व्यक्ति दोषपूर्ण कार्य एवं पाप-कर्मों में लिप्त नहीं होता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २८ जुलै, २०२१

रक्त गट कसे ओळखावे


══════════════════════

    संकलन ):

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🌡 *रक्तगट कशावरून ठरवतात ?* 📊

_____________________________


*🔴तुमचा रक्तगट कोणता हे अनेकदा अनेकांनी तुम्हाला विचारले असेल. रक्तगट माहीत नसण, हे सुशिक्षित लोकांना कमीपणाचे वाटू लागले आहे. ही चांगली गोष्ट आहे. या रक्तगटांविषयी थोडक्यात माहिती करून घेऊ. सगळ्यांचे रक्त लाल असते व सगळ्यांच्या रक्तात लाल, पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन, पाणी हे घटक सारखेच असले तरी रक्तगटाच्या बाबतीत मात्र ते सारखे नसते.*


*🔴लॅण्डस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला. लाल रक्तपेशींवर A, B या घटकांच्या (अॅंग्ल्युटीनोजेन) असण्या वा नसण्यावर रक्ताचे चार गट करण्यात येतात. A व B या घटकांशी क्रिया करून लाल पेशी साकळवणाऱया घटकांना अॅग्लुटीनीन असे म्हणतात.*


*🔴A रक्तगट असणाऱ्या माणसाच्या रक्तात बीटा, B गटाच्या रक्तात अल्फा, O गटाच्या रक्तात अल्फा, बीटा दोन्ही अॅग्लुटिनीन उपस्थित असतात. AB गटाच्या रक्तात हे दोन्ही नसतात. A, B, O, AB अशा वरील वर्गीकरणाखेरीच रक्ताचे RH* *+ Ve आणि Rh - Ve असे वर्ग असतात. + Ve रक्त असेल तर त्यात D-* *अॅग्लुटोनोजेन असते व - Ve असेल तर ते नसते.*


*🔴त्यामुळे वरील वर्गीकरणावरून एकूण रक्तगट असे करता येतील :  A+, A-, B+, B-, AB+, AB-, O+, O-*

***यात कुणाचे रक्त कोणाला देता येते ? यासाठी एक* *विशिष्ट प्रकारचा चार्ट असतो.*


*यातही जर कुणाचा रक्तगट - Ve असेल तर त्यास + Ve रक्तगटांचे रक्त चालणार नाही. त्यास - Ve* *रक्तगटाचेच रक्त द्यावे लागते* *परंतु + Ve ला - Ve रक्तगटाचे रक्त चालू शकते.*


*या रक्तगटांचे महत्त्व आपल्याला रक्त स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते. तसेच जर मातेचा रक्तगट - Ve असेल आणि तिच्या गर्भात जर + Ve रक्तगटाचे मूल असेल तर त्या रक्तांमध्ये विरोधी क्रिया होऊ शकते आणि मातेवर व गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतात.*


*🔴रक्तगटाचा आणखी एक उपयोग म्हणजे यावरून पालकत्व सिद्ध करता येऊ शकते. लँडस्टीनरच्या या शोधामुळे रक्तदानाच्या क्षेत्रात खूप मोलाचा विकास झाला आहे.*


═══════════════════════

 

28 जुलै जागतिक कावीळ दिवस

 *२८ जुलै*

*जागतिक कावीळ दिवस*

(Hepatitis B Day)

💉💉💉💉💉💉💉💉💉💉

*Baruch Blumberg*

*कावीळ आजारावर लस शोधुन काढली*


*जन्मदिन - २८ जुलै १९२५*


संसर्गजन्य रोगांच्या उत्पत्ती आणि त्यांचा प्रसार याबद्दलचे संशोधन तसेच त्यावरील नवीन यंत्रणेसंबंधित शोधांसाठी ब्लॉम्बरग यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले." ब्लंबर्गने हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी आणि लस विकसित केली .


कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.

कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.

आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ,ओकारी,भूक मंदावणे, गुबारा धरणे,शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.

दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.

अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.

कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.

शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


षण्णामात्मनि नित्यानाम्

              ऐश्वर्यं योऽधिगच्छति।

न स पापैः कुतोऽनर्थै:

              युज्यते विजितेन्द्रियः॥


भावार्थः-  *जो व्यक्ति मन के अंदर रहने वाले काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार तथा ईर्ष्या नामक छह शत्रुओं को जीत लेता है, वह जितेंद्रिय हो जाता है। ऐसा व्यक्ति दोषपूर्ण कार्य एवं पाप-कर्मों में लिप्त नहीं होता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २६ जुलै, २०२१

वेड्या माणसाच्या मेंदुत काय बीघाड होतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 

**********************************

वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.


मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.


वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?


आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.


मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.



*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज


तंजावर भोसले घराण्याचे अपरिचित माहिती

 *तंजावरच्या भोसले राजे घराण्याविषयी अपरिचीत माहिती*


*१) छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधु व्यंकोजीराजांना १६७५ मध्ये आदिलशहाने तंजावरमध्ये राज्य करणाऱ्या त्रिची येथील नायकाला धडा शिकविण्यासाठी पाठविले होते. व्यंकोजीराजांनी त्रिचीच्या नायकाला खाली खेचुन आदिलशहाच्या मृत्युनंतर स्वतःला राजे घोषित केले.*


*२) दक्षिण दिग्विजयावेळी महाराजांनी तंजावरचे राज्य व्यंकोजींना परत केले आणि चांगले संबंध प्रस्थापित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले मराठा राजे होते.*


*३) चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला हा मराठा साम्राज्याचा भाग होता. तंजावरच्या राजांनी कावेरी खोऱ्याच्या आजुबाजुच्या प्रदेशावर राज्य केले.*


*४) तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण १८० वर्षे टिकुन होते. या १८० वर्षात एकुण १० राजे होऊन गेले.*


*५) सन १८३२ मध्ये तिसरे शिवाजी महाराज यांची सत्ता ब्रिटिशांनी बरखास्त केली. हे तंजावरचे शेवटचे मराठा राजे होय.*


*६) तंजावरच्या मराठा राजवटीतील सर्वात शुर व विद्वान राजा म्हणजे पहिले “सरफोजीराजे” होय. ते स्वतः उत्तम वैद्य व डोळ्यांचे डॉक्टर होते.*


*७) तंजावरचे मराठा साम्राज्य विद्वत्ता व कला संपन्न होते. तेथील मराठा राजांनी ५० हुन अधिक विविध विविध ग्रंथ लिहिले असुन त्यात १२ दर्जेदार नाटके आहेत. यातीलच एक मराठी नाटक रंगमंचावर तंजावर येथे सादर केले गेले, ते रंगमंचावरील पहिले मराठी नाटक होय.*


*८) राजा चोळ याने बांधलेल्या बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिराच्या भींतीवर मराठा राजांनी मराठा साम्राज्याचा जगातील सर्वात मोठा मराठी शिलालेख कोरला आहे.*


*९) भारतातील पहिला छापखाना राजे सरफोजी यांनी तंजावर येथे सुरु केला.*


*१०) कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिण्यास सुरुवात केलेला “शिवचरित्र” ह्या मुळ ग्रंथाची अस्सल प्रत येथे आजही आहे.*


*११) भारतातील मुलींची पहिली शाळा राजे सरफोजी यांनी तंजावर येथे काढली.*


*१२) मराठा राजांनी भरतनाट्यम या नृत्याला राजाश्रय दिला होता.*


*१३) मराठा राजांनी मराठी सण,उत्सव,व्रत,कला ई. तंजावर मध्ये रुजविले. तसेच सरफोजीराजे यांनी भव्य “सरस्वती महाल” हे ग्रंथालय उभारले आहे. त्यात युध्दशास्त्रापासुन वैद्यकशास्त्रापर्यंत पशु,पक्षी,आरोग्य,अर्थ,कला,ज्यातिषशास्त्र,वास्तुशास्त्र, बांधकामशास्त्र ईत्यादी १७ विषयावर हजारो ग्रंथ येथे जतन केलेले आहेत. एकुण ग्रंथसंपदा ३ लक्ष एवढी आहे.*


*१४) सरस्वती महाल ग्रंथालयात सुमारे ८० हजार ग्रंथ व हस्तलिखिते आहेत.  त्यात संस्कृतमधील ४० हजार हस्तलिखिते आहेत, तसेच अनेक तामिळ, तेलगु, मोडी, देवनागरी भाषेतील ग्रंथ आहेत.*


*१५) मोडी लिपीतील अडीच लाखांपेक्षा जास्त हस्तलिखितांचे ८५० गठ्ठे जतन करुन ठेवले आहेत.*


*१६) सरफोजीराजेंनी त्याकाळी लंडन, पॅरिस सारख्या शहरात चित्रकार पाठवुन त्या शहरांची चित्रे काढुन घेतली ती इथे पहायला मिळतात.*


*१७) तंजावरच्या या ग्रंथालयात एक ग्रंथ असा विस्मयचकित करणारा आहे, त्याच्या ओळी उजवीकडुन वाचल्या तर “रामायण”, डावीकडून वाचल्या तर “महाभारत” आणि वरुन खाली वाचल्या तर “श्रीमदभागवत” आहे.*


*१८) ताडाच्या, पामच्या झाडाच्या पानावर लिहिलेले पुरातन ज्योतिष शास्त्र व इतर ग्रंथ तंजावरच्या मराठा राजांनीच जतन करुन ठेवलेले आहेत.*


*१९) तंजावरच्या भोसले संस्थानने सन १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळी २००० किलो सोने भारत सरकारला मदत म्हणुन दिले होते.*


*२०) १९७१ च्या पाकिस्तान युद्धात भारत सरकारला मदत म्हणुन शस्त्रास्त्रे दिली होती.*


*२१) विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीला १०० एकर जमीन दान दिली होती.*


*२२) तंजावरमध्ये आजही सुमारे ५ लक्ष मराठी लोक राहतात, ते तामिळी पेहराव घालत असले तरी त्यांच्या घरात तोडकी मोडकी का होईना मराठीच बोलली जाते.*


*२३) सातारा, कोल्हापुर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक आहेत.*


*२४) तिथले विद्यमान छत्रपती बाबाजीराजे भोसले हे आहेत. बाबाजीराजे स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असुन त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.*


*२५) १ मे २०१५ रोजी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तंजावरच्या मराठा साम्राज्यवार एक स्पेशल रिपोर्ट देखील बनवला होता.*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

संकलन -) गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

11 वे भारताचे राष्ट्रपती डॉ कलाम सर यांची आज पुण्यतिथी

 


*ए.पी.जे. अब्दुल कलाम*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*🇮🇳🇮🇳भारताचे अकरावे राष्ट्रपती🇮🇳🇮🇳*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*स्मृतिदिन - २७ जुलै २०१५*


अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) 

जन्म -) १५ ऑक्टोबर १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ.कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ.कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *चतुर्थी*,शतभिषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २७ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


पुनर्वित्तं पुनर्मित्रं 

            पुनर्भार्या पुनर्मही।

एतत्सर्वं पुनर्लभ्यं 

            न शरीरं पुनः पुनः॥


*भावार्थ :— धन, संपति, मित्र, स्त्री  बार-बार मिल सकते हैं; लेकिन मनुष्य-शरीर केवल एक ही बार प्राप्त होता है। एक बार नष्ट हो जाने के बाद पुनः प्राप्त करना असंभव है। इसीलिए इस मानव-देह को अधिकाधिक राष्ट्र व मानव कल्याण में लगाना ही मानव-देह की सार्थकता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तंबाखू, पान खाल्यांने दात खराब होतात का


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

*तंबाखू पान खाल्ल्याने दात खराब होतात का?* 

************************************

तंबाखू वा पान खाऊन रस्त्यावर व कोठेही थुंकणाऱ्या लोकांची कोणाला किळस येणार नाही ? दुसरे म्हणजे कार्यालयात वा शाळेत कोणी पानाचा तोबरा भरून तुम्हाला शिकवले व तुमच्याशी बोलू लागले तर बरे वाटणार नाही. तंबाखूची गोळी लोक तोंडात ठेवतात. तंबाखूतील निकोटीन हे द्रव्य लाळेत मिसळते व दाताभोवती जमा होते. तोंडात कायम तंबाखू असल्याने तोंडाची स्वच्छता नीट राखली जात नाही. या दोन्ही कारणांमुळे दात पिवळट होतात. कालांतराने किडतात. पान खाल्ल्याने जीभ रंगते, हे तुम्हाला माहीत आहेच. सुपारीमुळे दातांवरील आवरणाला चिरा पडतात, त्यातून दात किडण्याला सुरुवात होते. कधी कधी तर सुपारी खाताना दाताचा टवकाही उडतो ! अर्थात क्वचित पान खाल्ले व नंतर खळखळून गुळण्या भरल्या तर काही नुकसान होत नाही; पण वारंवार पान खाण्याने आणि त्याची सवय लागण्याने (विशेषत: तंबाखूयुक्त) दातांना पिवळट लालसर रंग येतो व दात कालांतराने किडतात.


बसमध्ये सीटच्या बाजूला, जिन्याच्या भिंतीवर, ऑफिसच्या कोपऱ्यात अशा अनेक ठिकाणी हे तंबाखू वा पान खाणारे लोक इतस्तत: थुंकून ठेवतात. त्यामुळे तो सर्व भाग अस्वच्छ दिसतो. "थुंकू नये" अशा सूचनेच्या भोवतीही थुंकून ठेवलेले दिसते. या व्यसनांनी दात तर खराब होतातच, पण परिसरही अस्वच्छ होतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहिलेलेच बरे !


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

26 जुलै कारगिल विजय दिवस

 ********************************

*२६ जुलै - 🇮🇳 कारगिल विजय दिन 🇮🇳*

********************************


कारगिल विजय दिवस. १९९९ साली आजच्याच दिवशी भारताने कारगिल मध्ये पाकीस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. ‘ऑपरेशन विजय’ नावाखाली भारताने ही मोहिम फत्ते केली होती. पाकने या युद्धात २७०० पेक्षा जास्त सैनिक गमावले होते. पाकिस्तानचे १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही एवढे नुकसान झाले नव्हते.


कारगील हे जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रदेशावर हिवाळ्यात बर्फाची चादर पसरते. ६० फुटांपेक्षा जास्त उंचीचे बर्फाचे थर सगळं गिळंकृत करतात. -६० अंश सेंटिग्रेडपर्यंत तापमान खाली घसरते. 


असाच १९९९ मधील हिवाळा. फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. टायगर हिल, तोलोलोंग हिल आदी पर्वत शिखरांवरील लष्करी ठाणे खाली करून नियमा प्रमाणे भारतीय फौजा बेस कॅम्पला परत आलेल्या, कारण भारत-पाकिस्तान या दोन देशांतला सिमला करारच तसा होता, पण पाकिस्तानने डाव साधला. या सगळ्या प्रदेशावर आपले सैनिक घुसवले आणि आजूबाजूच्या छोट्या गावांमधील भारतीय नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात केली. 


मे च्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली आणि मग प्रतिचढाईच्या हालचाली सुरू झाल्या. भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. 


पाकिस्तानी लष्कर उंच पहाडावर तर भारतीय सैन्य जमिनीवर. श्रीनगर-कारगिल-लेह हा हायवे पाकिस्तानी लष्कराच्या माराच्या टप्प्यात आलेला. आणि हा जर त्यांनी काबीज केला तर भारतीय सैन्याच्या हालचालींवर मर्यादा येणार. अशी सगळी विपरीत परिस्थिती. वरची शिखरे काबीज करण्यासाठी चढाई करायची ती रात्रीच्या कीर्र अंधारात आणि प्रचंड थंडीत!.


अनेक कारणांमुळे कारगीलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. 


भारतीय सरकारने 'ऑपरेशन विजय' या नावाखाली कारगीलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. २६ मे १९९९ रोजी भारताकडून पहिला हल्ला झाला. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झाले. ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. टायगर हिलच्या या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांवर २.५ लाख रॉकेट डागले. म्हणजे दररोज पाच हजार रॉकेट डागण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट केवळ दुसऱ्या महायुद्धात डागण्यात आले होते. या युद्धात ३० हजार भारतीय जवान लढले त्यापैकी ५२७ शहिद, तर १३६३ जवान गंभीर जखमी झाले. यात पाकिस्तानचे ७०० सैनिक मारले गेले. भारतीय सैन्याने बोफोर्स तोफांचा यशस्वी मारा करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात १० हजार कोटी रुपये खर्च झाले.


हवाई दलाने या युद्धात महत्वाची जबाबदारी पार पाडली. कारगिलची उंची समुद्र सपाटीपासून १६००० ते १८००० फूट उंच आहे. यामुळे विमानांना उड्डाण करण्यासाठी अडचणी येत होत्या. विमानांना जवळपास २०,००० फूट उंचावर उडावे लागत होते. अशा उंचीवर हवेचे घनत्व ३०% कमी असते. अशा परिस्थितीत पायलटचा जीव विमानातच गुदमरण्याची शक्यता असते आणि विमान दुर्घटना होऊ शकते. 


भारतीय हवाईदलाने कारगिल युद्धात पाकिस्तान विरुद्ध मिग-२७ आणि मिग-२९ चा वापर केला. या युद्धात हवाईदलाने जवळपास ३०० उड्डाणे केली. भारतीय हवाई दलाच्या कागदपत्रांमध्‍ये नवीन खुलासा झाला आहे. कारगिलच्या युध्‍दात भारत पाकिस्तानचा हवाईतळ पूर्णपणे उद्ध्‍वस्त करु शकत होता, असा त्यात उल्लेख आहे. १३ जून १९९९ रोजी भारतीय हवाई दलाचे फाइटर जेट हल्ला करण्‍यासाठी पाकिस्तानच्या हवाई तळापासून काही मिनिटांच्या अंतरावर होते.


मे १९९९ मध्ये सुरू झालेले आणि ७७ दिवस चाललेले कारगिल युद्ध भारतीय सैन्यदलाच्या विजयी अध्यायातील आणखी एक सोनेरी पान मानले जाते. कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. 


पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. १९९८ मध्ये हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाले होते आणि त्यानंतरचे हे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. 


याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. पाश्चिमात्य देशांनी युद्ध भडकवल्याचा ठपका पाकिस्तानवरच ठेवला. या युद्धात पहिल्यापासूनच "हे सैनिक आमचे नाही" असा पवित्रा घेतल्यामुळे काही पाकिस्तानी सैनिकांचे दफ़नविधी हिंदुस्तानने केले, म्हणूनच जागतिक पातळीवर हिंदुस्तानने या युद्धात लश्करी विजयाबरोबरच राजकारणी विजयही मिळवला.


कारगिल युद्धात मुजाहिदीन सहभागी होता. हे युद्ध पाकिस्तानच्या नियमीत सैनिकांनी लढले होते. या रहस्याचा उलगडा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर विभागाचा माजी अधिकारी शाहिद अजीज याने केला होता. अनेक युद्धतज्ज्ञांचे म्हणणे आहे की कारगिल युद्ध हे वाटत होते त्यापेक्षा जास्त धोकादायक होते. तत्कालिन परिस्थिती पाहून मुशर्रफने अण्वस्त्रांचा वापर करण्याचीही तयारी केली होती.


२६ जुलै १९९९ या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला. कारगीलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्यानंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगील युद्धाच्या निमित्ताने दिसली.

*🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳*

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *तृतीय*,घनिष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, २६ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"स्मरण रहे -- मीठा शहद बनाने वाली मधुमक्खी भी अवसर पड़ने पर अकारण डंक मारने से नही चूकती.. अतः सचेत रहें, क्योंकि अत्यधिक मीठा बोलने वाला व्यक्ति भी आपको "हनी" नहीं अपितु "हानि" भी दे सकता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, २४ जुलै, २०२१

एकनाथ वसंत चिटणीस उपग्रह

 *🔭एकनाथ वसंत चिटणीस🔭*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*उपग्रहशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ*


*जन्मदिन - २५ जुलै १९२५*


प्रा.एकनाथ वसंत चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे, (स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर) माजी संचालक आहेत. कोल्हापूर येथे जन्मलेल्या प्रा.चिटणीस यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्र या विषयांत पदवी संपादन केलेल्या प्रा. चिटणीसांनी त्यानंतर रेडिओसंपर्क क्षेत्रातील पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाईंनी स्थापन केलेल्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी आपल्या संशोधनास प्रारंभ केला. प्रा. चिटणीस हे भारतीय अंतराळ कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून सहभागी होते. अग्निबाण प्रक्षेपण केंद्रासाठी केरळमधील थुंबा या जागेची आणि उपग्रह प्रक्षेपण केंद्रासाठी श्रीहरिकोटा या जागेची निवड करण्यामागे मुख्यत्वे प्रा. चिटणीस यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. भारताच्या अंतराळ क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘इन्सॅट’ मालिकेतील उपग्रहांच्या आखणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत केला जाण्याच्या दृष्टीने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे.


प्रा. चिटणीसांचे १९५०-१९६० या दशकातले संशोधन हे वैश्विक किरणांशी संबंधित होते. या संशोधनात तामीळनाडूमधील कोडाईकॅनॉल येथून केलेल्या वैश्विक किरणांच्या वर्षावाबद्दलच्या विशेष अभ्यासाचाही समावेश आहे. त्यांची पीएच.डी. ही पदवी याच विषयाशी संबंधित आहे. वैश्विक किरणांवरील संशोधनासाठी १९५८ ते १९६१ या तीन वर्षांच्या काळात ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतही राहिले होते. १९६०-१९७० या दशकांत प्रा. चिटणीसांनी क्ष-किरण खगोलशास्त्रावर आपले लक्ष केंद्रित केले. या संशोधनात अंतराळातील क्ष-किरणांच्या विविध स्रोतांचे वेध घेण्यासाठी अग्निबाणांवर बसवलेल्या उपकरणांचाही वापर केला गेला.


अंतराळ तंत्रज्ञानाचा शेत़ी, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन, अशा विविध क्षेत्रांत वापर करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने ‘नासा’च्या सहकार्याने १९७०च्या दशकात ‘साइट’ (सॅटेलाइट इंस्टक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट) हा बहुपयोगी प्रकल्प आखला होता. अवकाश उपयोजन केंद्राचे तत्कालीन संचालक प्रा. यशपाल यांच्या सक्रिय पुढाकारातून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी प्रा. चिटणीस यांनी यशस्विरीत्या पार पाडली. १९७५-१९७६ साली प्रत्यक्षात आलेल्या या प्रकल्पामुळे विविध राज्यांतील सुमारे २९०० खेड्यांतील दूरचित्रवाणी संच उपग्रहाद्वारे एकमेकांना जोडले जाऊन विविध कार्यक्रमांचे सर्वत्र एकाच वेळी प्रसारण करणे शक्य झाले. या प्रकल्पामुळे दूरचित्रवाणी हे नुसतेच करमणुकीचे माध्यम न राहत़ा, या माध्यमाची राष्ट्रीय स्तरावरची सर्वंकष उपयुक्तता सिद्ध झाली.


भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात सुरुवातीपासून सहभागी असणारे प्रा. चिटणीस १९६२ साली अंतराळ संशोधनासाठी डॉ. विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय समितीचे (इन्कोसपार) सभासद सचिव होते. प्रा. चिटणीसांचा संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संघटनांशी निकटचा संबंध आला असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय अंतराळविषयक परिषदांतून भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. १९८१-१९८५ या काळात प्रा. चिटणीस हे अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक होते. १९८५ साली या पदावरून निवृत्त झाल्यावर दोन वर्षांसाठी त्यांची याच संस्थेत सल्लागार म्हणून विशेष नेमणूक केली गेली होती. त्यानंतर त्या वेळी नुकत्याच सुरू झालेल्या ‘कंट्रिवाइड क्लासरूम’ या दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता.


गेली अनेक वर्षे प्रा.चिटणीस हे पुणे विद्यापीठाच्या ‘व्यवस्थापन’, ‘पत्रकारित़ा’, ‘मास कम्युनिकेशन’, अशा विविध विषयांच्या अभ्यासक्रमांच्या आयोजनांस मार्गदर्शन करीत असून ते या विषयांत अध्यापनही करीत आहेत. १९८६ सालापासून ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक समितीवर असणाऱ्या प्रा. चिटणीसांनी २००८-२००९ या काळात या संस्थेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. ‘राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाऴा’, ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या विज्ञान संशोधन संस्थांपासून ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापी़ठ’, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापी़ठ’, ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था’ यांसारख्या दर्जेदार शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापकीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.


प्रा.चिटणीस हे आपल्या बहुविध कार्याद्वारे विविध सन्मानांचे मानकरी ठरले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील बहुमोल योगदानाबद्दल १९८५ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान आणि समाज यांच्यातील अन्योन्य संबंधांवर आधारित कार्याबद्दल त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विशेष पारितोषिकाने गौरवण्यात आले. प्रा. चिटणीसांना ‘फाय फाउंडेशन’चा सन्मान  व ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे ‘आर्यभट्ट’ पारितोषिकही मिळाले आहे. दूरसंपर्क क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून प्रा. चिटणीसांचा विशेष पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

—डॉ. राजीव चिटणीस

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *१/२*,श्रवण नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, २५ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *जीवन में कभी किसी से अपनी तुलना मत कीजिये। कभी किसी अन्य व्यक्ति के गुणों को देखकर हीनभावना अथवा ईर्ष्या बोध न लाएं, क्योंकि कोई भी व्यक्ति ऐसा नही है, जिसमें कोई गुण व अवगुण न हो। आप अपने गुणों को पहचानिए। आप जैसे हैं-सर्वश्रेष्ठ हैं। ईश्वर की प्रत्येक रचना अपने आप में सर्वोत्तम है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"एक विकत दुसरा फुकट "

 🥀🥀


🌺 

*एक विकत घ्या...*

*त्यावर एक फुकट घ्या.*

*विचार केला तर...*

*ही एक व्यापारी व्यवस्था वाटते,*

*पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडित व्यवस्था आहे.*

*जर आपण राग विकत घेतला,*

*तर आपल्याला एसिडिटी बद्धकोष्ठता फुकट मिळते.*

*जर आपण ईर्ष्या विकत घेतली,*

*तर आपल्याला डोकेदुखी फुकट मिळते.*

*जर आपण द्वेष विकत घेतला,*

*तर आपल्याला अल्सर पोटदुखी फुकट मिळते.*

*जर आपण ताणतणाव* *विकत घेतला,*

*तर आपल्याला रक्तदाब BP फुकट मिळतो.*

*अशाप्रकारे आपण वार्तालाप,*

*बोलाचाली करून विश्वास* *विकत घेतला,*

*तर आपल्याला मैत्री दोस्ती फुकट मिळते.*

*जर आपण व्यायाम कसरत विकत घेतला,*

*तर आपल्याला निरोगी आयुष्य फुकट मिळते.*

*जर आपण मन:शांती विकत घेतली,*

*तर आपल्याला समृद्धी फुकट मिळते.*

*जर आपण ईमानदारी प्रामाणिकपणा विकत घेतला,*

*तर आपल्याला झोप फुकट मिळते.*

*जर आपण प्रेमभाव विकत घेतला,*

*तर आपल्यावर सद्गुण सदाचारासह,*

*सद्गुरू कृपा सहज प्राप्त होते.*

*हे सर्व आपल्यावर,*

*अवलंबून आहे की,*

*आपण...*

*काय विकत घेतलं पाहिजे...!!*

): गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 


🥀🥀

गुरू पौर्णिमा निमित्ताने लेख गजानन गोपेवाड

 


दातावरून घासणे वय क्ढता येते का?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

*दातांवरून माणसाचे वय काढता येते का ?* 


काही वेळेस मृत्यूनंतर विशेषतः गुन्ह्याच्या तपासात मृत व्यक्तीचे वय किती आहे हे सांगावे लागते. त्यासाठी मृत व्यक्तीचे हाडे, दात यांचा उपयोग होतो. 


दातांचे दोन प्रकार आहेत. दुधाचे दात आणि कायमचे दात यांच्यामध्ये फरक असतो. दुधाचे दात येऊन ते पडून कायमचे दात येण्याच्या पद्धतीला एक विशिष्ट क्रम असतो. विशिष्ट वयात हे दात येत असतात आणि पडत असतात. जसे ३ वर्षांपर्यंतच दुधाचे सर्व दात येतात. कायमच्या व दुधाच्या दातांच्या रंगांमध्ये, आकारांमध्ये फरक असतो, त्यामुळे यावरून वय सांगता येते. २५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीचे वय यावरून काढता येते. या वयापर्यंत कायमचे सगळे दात आलेले असतात. 


वय काढण्यासाठी दातांच्या एक्सरेचाही उपयोग होतो. क्ष- किरण तपासणीने दातांच्या मुळाचे कॅल्सिफिकेशन झालेले आहे की नाही ते समजते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस अक्कलदाढ आलेली नाही पण हिरड्यात त्याच्या मुळाचे कॅल्सिफिशन झालेले क्ष-किरण परीक्षेत दिसल्यास त्या व्यक्तीचे वय सत्तरच्या पुढे आहे, हे नक्कीच ठरते. 

काही वेळेस एकदम अचूक वय काढावे लागते. अशा वेळेस सूक्ष्मदर्शकाखाली दातांचा छेद घेऊन तपासणी केली जाते. दातावरील निर्माण झालेल्या आडव्या रेषांवरून वय काढले जाते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *पौर्णिमा*,उ.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २४ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


तुलसी मीठे वचन ते,

               सुख उपजत चहुँ ओर !

वशीकरण एक मन्त्र है,

               तज दे वचन कठोर !!


*भावार्थः- तुलसीदास जी कहते हैं कि मीठे वचन बोलने से सर्वत्र सुख होता है एवम् सभी प्रसन्न होते है। मीठा बोलकर आप किसी को भी वश में कर सकते हैं। जबकि कड़वा बोलकर केवल शत्रु ही पैदा होते हैं। अतः कभी भी कड़वी बात नहीं बोलनी चाहिए"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


24 जुलै भारतीय विज्ञान संस्था स्थापन करण्यात आली

 *⚗️🧪🔬२४ जुलै १९११🔬🧪⚗️*

⚗️🔬🧪🧫🌡️⚗️🔬🧪🧫🌡️⚗️

*"भारतीय विज्ञान संस्था" स्थापना*

⚗️🔬🧪🧫🌡️⚗️🔬🧪🧫🌡️⚗️

भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर,भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियांत्रिकी मध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी,संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी,आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र,रसायन शास्त्र इत्यादी.भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.


भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

गुरुवार, २२ जुलै, २०२१

हद्याचे कार्य कसे चालते.

 संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

❤️❤️  *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 

***********************************

विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे  दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.


उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.


हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

23 जुलै चंद्रशेखर आझाद जन्म दिवस

 ********************************

*२३ जुलै - क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद जन्मदिन*

********************************


जन्म - २३ जुलै १९०६ (मध्यप्रदेश)

मृत्यू - २७ फेब्रुवारी १९३१ (अलाहाबाद)


ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात मात्र विलीन झाले.


आपल्या भारतावर सुमारे १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते. स्वराज्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अनेकांनी अनेक विविध मार्ग अवलंबिले. अनेक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी कसे लढले याचे धडे आपल्याला लहानपणापासूनच दिले जातात. त्यांच्याशी निगडित अनेक किस्से, गोष्टी आपण ऐकत असतो.


असाच एक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी स्वतःचे प्राण त्यागून अजरामर झाला. व्यवस्थित भांग पाडलेले काळेभोर केस, हातावर घड्याळ, पिळदार आणि टोकेरी मिश्या आणि एका हाताने त्या मिश्याना पीळ देणारा फोटो आपण पाहिला कि आपल्या ओठांवर लगेच नाव येते आझाद ! चंद्रशेखर आझाद ! जहाल मतवादी आझाद हे आजही सर्वांना प्रेरणा देऊन जातात. आज याच आझादांच्या आझाद अशा आयुष्यावर हा लेख.


*कसे झाले तिवारी ते आझाद ?*


२३ जुलै १९०६ मध्ये, मध्य प्रदेश मधील भाबरा या गावात सीताराम तिवारी आणि जागरानी देवी तिवारी यांच्या पोटी मुलगा जन्माला आला, मुलाचे नाव ठेवले चंद्रशेखर. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार आणि मल्लखांब सारख्या खेळांत प्रवीण होते. या छोट्याश्या गावात चंद्रशेखर यांना स्वतःचे अस्तित्व सापडत नव्हते. वयाच्या १३/१४ व्या वर्षी आपल्या गावात येणाऱ्या एका व्यापाऱ्यासोबत चंद्रशेखर आपला रस्ता बनवत निघाले मुंबई कडे. मुंबई मध्ये आले, काही काळ जहाजावर काम देखील केले, मग संस्कृत शिक्षणासाठी ते गेले बनारस येथे.


मुंबई, बनारस यांसारखी मोठी शहरे त्या काळी स्वातंत्र्य आंदोलनाची केंद्रे होती. याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे संपूर्ण देश दुःखाच्या गर्तेत होता. या आंदोलनांची माहिती सर्वांसारखीच चंद्रशेखर या १५ वर्षाच्या मुलापर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. त्याने मात्र फक्त या बातम्या ऐकल्या नाहीत, त्याने या बातम्यांचा एक भाग होण्याचे ठरविले आणि या १५ वर्षाच्या मुलाने महात्मा गांधीजी यांनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता, पोलिसांनी अनेक मुलांना अटक केली आणि यात चंद्रशेखर यांना सुद्धा अटक केली गेली.


त्यांच्यावर कोर्टात खटला चालू झाला, याच खटल्यात त्यांना पेश करताच त्यांना नाव विचारण्यात आले, यावर ते म्हणाले, "मी चंद्रशेखर आझाद" आणि बस्स त्या दिवसापासून चंद्रशेखर तिवारी यांना सगळे चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखू लागले.


*जहाल मतवादी प्रवास*


असहकार आंदोलनातील खटल्यामध्ये शिक्षा भोगून आझाद बाहेर पडले परंतु देशासाठी आता आक्रमक वृत्तीने आपल्याला पेटून उठले पाहिजे आणि इंग्रजांना जश्यास तसे उत्तर दिले पाहिजे या विचाराने आझाद स्वस्थ बसू शकत नव्हते. गांधीजींनी लोकांच्या हिंसक पद्धतींमुळे असहकार आंदोलन स्थगित केले आणि मग आझाद यांना आपला मार्ग बदलावासा वाटला. फक्त अहिंसेने क्रांती येणार नाही तर त्याला हिंसेची सुद्धा जोड हवी म्हणून चंद्रशेखर आझाद यांनी जहाल मतवाद्यांचा मार्ग स्वीकारला आणि आझाद यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या आझादीकडे पाऊले टाकली.


या प्रवासात ते अनेकांना भेटले आणि यातूनच ते जोडले गेले हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेसोबत. ते मनापासून या संघटनेचा भाग झाले आणि संघटनेसाठी प्रचार करीत असत. या संघटना चालवायच्या म्हणजे पैसे हवेत आणि पैसे मिळवण्यासाठी आझाद या संघटनेसोबत मिळून अनेक सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकायचे. या इंग्रज सरकारने भारताला बरेच लुटले, आता वेळ होती आपण त्यांना लुटण्याची. या छोट्या मोठ्या चोऱ्या आणि लूटमार करून आझाद स्वस्थ नव्हते, त्यांच्या भक्कम शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, पडेल ते काम करायची हिम्मत आणि निर्णयक्षमता या गुणांमुळे ते लवकरच संघटनेचा एक उत्तम, विश्वासू चेहरा आणि पुढारी बनले.


*काकोरी आणि बरंच काही :*


नियमित अभ्यास, कसरत, बंदुकीसारख्या शस्त्रांचा सराव यामुळे आझाद आता अतिशय तरबेज झाले होते. अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा आता एक मोठा झटका देणे त्यांच्या मनात आले. यातूनच त्यांना युक्ती सुचली काकोरी लूटमारीची. ९ ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे इंग्रजांच्या खजिन्याची मालगाडी जात असताना अचानक त्या मालगाडीवर हल्ला करून मोठी धनसंपत्ती या क्रांतिकारकांनी गोळा केली.


या घटनेने इंग्रजांना चांगलेच हादरवून सोडले. त्यांनी आरोपींवर ताबडतोब खटले चालविले आणि या काळात आझाद आपला वेष बदलून अज्ञातवासात आपले कार्य करीत होते. या आरोपींमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष बिस्मिल आणि त्यांच्यासोबत संघटनेचे अनेक महत्त्वाचे क्रांतिकारी सामील होते आणि या सर्वाना फाशीची शिक्षा सुनावली गेली.


संघटनेचा मुख्य आधार गेल्यावर संघटना विखुरली गेली. आझाद यांच्या खूप प्रयत्नांनंतरही काही झाले नाही. परंतु त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. कालांतराने त्यांची ओळख भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू अशा क्रांतिकारकांशी झाली आणि मग आझाद यांना बळ आले. त्यांनी भगत सिंग, सुखदेव आणि अजून काही साथीदारांसोबत मिळून पुन्हा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करायचे ठरविले आणि अखेर सप्टेंबर १९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. आता या संघटनेचे आझाद हे प्रमुख होते आणि या संघटनेमध्ये भगत सिंग आणि त्यांचे साथीदार अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावत होते.


या नंतर या संघटनेमार्फत बॉम्ब बनविणे, शस्त्रसाठा जमा करणे आणि अशी अनेक क्रांतिकारी कामे केली जात होती. अशातच भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता आझाद पुन्हा एकटे, तरीही हार न मानता त्यांनी या तिघांना सोडविण्याचे सर्व प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. तरीही आपल्या क्रांतिकारी कामांमध्ये आझाद यांनी खंड पडू दिला नाही. आता तर ते अजून आक्रमक झाले आणि १९२९ मध्ये त्यांनी चक्क दिल्ली जवळील व्हाइसरॉयची अक्खी रेल्वे गाडी बॉम्ब लावून नेस्तनाबूत केली. आता मात्र इंग्रज अजूनच दचकले आणि आझाद यांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न अजून जोरात चालू झाले. अनेक प्रयत्नांनंतरही इंग्रज आझाद यांना पकडू शकत नव्हते.


*आहे आझाद नि राहीन आझाद :*


आपल्या संघटनेची सुटत चाललेली एकता, अनेक क्रांतीकारकांना खटल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न, संघटनेसाठी धन गोळा करण्याचे विविध मार्ग या साऱ्यांचा विचार आझाद यांच्या मनात घर करून होता. त्यांचे अनेक साथीदार त्यांच्या विरुद्ध झाले होते याची देखील त्यांना खबर लागली नव्हती. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथील अल्फ्रेड उद्यानात आझाद आपला साथी सुखदेव (फाशी गेलेला सुखदेव नाही) याच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करीत होते आणि अनेक समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते.


अशातच त्यांचा एक जुना साथीदार वीरभद्र तिवारी याने त्या भागातील पोलीसांना बातमी दिली कि तुम्ही ज्या आझादला शोधून दमला आहात तोच आझाद सध्या अल्फ्रेड उद्यानात तुम्हाला सापडेल. ताबडतोब इंग्रज अधिकारी आपल्यासोबत मोठी फौज घेऊन उद्यानाकडे रवाना झाले. या प्रकारची खबर आझाद यांना मुळीच नव्हती.


अनेक विषयांवर चर्चा करत ते सुखदेव सोबत एका झाडाच्या सावलीत बसलेले होते. अचानक एकाएकी अक्खे उद्यान इंग्रजांनी काबीज केले आणि आझाद यांना शरण येण्याची आज्ञा करण्यात आली, केलेली आज्ञा धुडकावून आझाद यांनी आपली पिस्तूल काढली आणि ते इंग्रजांवर गोळीबार करू लागले. यातच इंग्रजाची गोळी थेट आझाद यांच्या मांडीवर येऊन लागली. यातनांना कुरवाळत बसायला वेळ नव्हता, सगळं कठीण होऊन बसलं होतं.


पिस्तूल छोटी, त्यात गोळ्या सुद्धा मोजक्या आणि समोर अक्खी पोलीस फौज आणि मागे अनेक जबाबदाऱ्या आणि या साऱ्याच्या पलीकडे माझ्या भारत मातेचे स्वातंत्र्य. काय करावे काही सुचेना. त्यांनी सुखदेव याला सुखरूप पळण्यास वाट दिली आणि पुढील देशकार्य चालू ठेवण्यास सांगितले.


इंग्रजांच्या गोळीबाराला आझाद उत्तर तर देत होते परंतु हळूहळू परिस्थिती बदलून गेली. आझाद एकटे आणि मोजक्या बंदुकीच्या गोळ्या. याउलट इंग्रजांची फौज आणि अमाप गोळ्या. कसा मुकाबला व्हावा ?


लढता लढता शेवटची एक गोळी शिल्लक राहिली. काय करावे ? इतरांसारखे इंग्रजांना शरण जावे आणि मग त्यांनी आज्ञा दिल्यावर फाशी जावे ? त्यांचा विजय होऊ द्यावा कि आझाद हे नाव सार्थ करावे ?


आझाद यांनी पहिल्यांदा जेव्हा पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली होती तेव्हाच ठरविले होते कि आझादला या पुढे कोणताही पोलीस हात लावू शकणार नाही आणि कोणतेही कारागृह बंद करून ठेऊ शकणार नाही आणि इंग्रजांच्या बेड्या कधीही माझ्या हाताची कार्यक्षमता जखडु शकणार नाहीत. आपला हा निश्चय टिकविणे त्यांना जास्त योग्य वाटले. त्यांनी मन घट्ट केले, शेवटची एक गोळी पिस्तुलात टाकली. भारतमातेला आठवून तीच पिस्तूल आपल्या कपाळाला लावून त्यांनी स्वतःला संपविले.


इंग्रज आले पण आझाद नाही तर आझादांचा मृतदेह त्यांच्या हाती आला. आझाद यांनी आपले नाव सार्थ केले. ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात विलीन झाले.


ते आझाद होते नि आझाद म्हणूनच राहिले !


प्रणाम ह्या भारतमातेच्या थोर पुत्राला !


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

********************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *पौर्णिमा*,पू.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, २३ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

                  *“आज गुरुपौर्णिमा”*


*गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वर:*

 *गुरु साक्षात् परं ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या आयुष्यात ज्यांनी मला घडवलं,

या जीवनात मला जगायला शिकवलं,लढायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे.मग तो लहान असो वा मोठा..

मी प्रत्येकाकडून कळत-नकळत खुप काही शिकत असतो..

अशा आपल्या सारख्या मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून कोटी कोटी धन्यवाद…! 

     म्हणतात ना......

*बिना गुरु के कोई अपनी* *जिवन कि,नाव चला नही सकता* 

*चला दि है तो लाख कोशिश करके भी पार लगा नही सकता* और

*जिसका साथ दिया गुरु ने*

*फिर उसे कोई डूबा नही सकता* ऐसे मेरे समस्त गुरूवर्य को कोटी कोटी नमन...

🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

*🚩गुरु पौर्णिमेच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गुरू महात्मे गुरुपौर्णिमा

 *🚩गुरुपूर्णिमा आषाढ़ पूनम के दिन ही क्यो मनाई जाती है? जानिए रहस्य🚩*


*🚩आषाढ़ शुक्ल पूर्णिमा को गुरुपूर्णिमा एवं व्यासपूर्णिमा कहते हैं । गुरुपूर्णिमा गुरुपूजन का दिन है । गुरुपूर्णिमा का एक अनोखा महत्त्व भी है । अन्य दिनों की तुलना में इस तिथि पर गुरुतत्त्व सहस्र गुना कार्यरत रहता है । इसलिए इस दिन किसी भी व्यक्ति द्वारा जो कुछ भी अपनी साधना के रूप में किया जाता है, उसका फल भी उसे सहस्र गुना अधिक प्राप्त होता है । इस साल 23 व 24 जुलाई को गुरुपूर्णिमा है।*


*🚩भगवान वेदव्यास ने वेदों का संकलन किया, 18 पुराणों और उपपुराणों की रचना की । ऋषियों के बिखरे अनुभवों को समाजभोग्य बना कर व्यवस्थित किया । पंचम वेद 'महाभारत' की रचना इसी पूर्णिमा के दिन पूर्ण की और विश्व के सुप्रसिद्ध आर्ष ग्रंथ ब्रह्मसूत्र का लेखन इसी दिन आरंभ किया । तब देवताओं ने वेदव्यासजी का पूजन किया । तभी से व्यासपूर्णिमा मनायी जा रही है । इस दिन जो शिष्य ब्रह्मवेत्ता सदगुरु के श्रीचरणों में पहुँचकर संयम-श्रद्धा-भक्ति से उनका पूजन करता है उसे वर्षभर के पर्व मनाने का फल मिलता है ।*


*🚩भारत में अनादिकाल से आषाढ़ मास की पूर्णिमा को गुरुपूर्णिमा पर्व के रूप में मनाया जाता रहा है। गुरुपूर्णिमा का त्यौहार तो सभी के लिए है । भौतिक सुख-शांति के साथ-साथ ईश्वरीय आनंद, शांति और ज्ञान प्रदान करनेवाले महाभारत, ब्रह्मसूत्र, श्रीमद्भागवत आदि महान ग्रंथों के रचयिता महापुरुष वेदव्यासजी जैसे ब्रह्मवेत्ताओं का मानवऋणी है ।*


*🚩भारतीय संस्कृति में सद्गुरु का बड़ा ऊँचा स्थान है । भगवान स्वयं भी अवतार लेते हैं तो गुरु की शरण जाते हैं । भगवान श्रीकृष्ण गुरु सांदीपनिजी के आश्रम में सेवा तथा अभ्यास करते थे । भगवान श्रीराम गुरु वसिष्ठजी के चरणों में बैठकर सत्संग सुनते थे । ऐसे महापुरुषों के प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करने के लिए तथा उनकी शिक्षाओं का स्मरण करके उसे अपने जीवन मे लानेके लिए इस पवित्र पर्व ‘गुरुपूर्णिमा’ को मनाया जाता है ।*


*🚩गुरु का महत्त्व-*


*🚩गुरुदेव वे हैं, जो साधना बताते हैं, साधना करवाते हैं एवं आनंद की अनुभूति प्रदान करते हैं । गुरु का ध्यान शिष्य के भौतिक सुख की ओर नहीं, अपितु केवल उसकी आध्यात्मिक उन्नति पर होता है । गुरु ही शिष्य को साधना करने के लिए प्रेरित करते हैं, चरण दर चरण साधना करवाते हैं, साधना में उत्पन्न होनेवाली बाधाओं को दूर करते हैं, साधना में टिकाए रखते हैं एवं पूर्णत्व की ओर ले जाते हैं । गुरुके संकल्पके बिना इतना बडा एवं कठिन शिवधनुष उठा पाना असंभव है । इसके विपरीत गुरुकी प्राप्ति हो जाए, तो यह कर पाना सुलभ हो जाता है ।*



*🚩गुरुपूर्णिमा का अध्यात्मशास्त्रीय महत्त्व-*


*इस दिन गुरुस्मरण करनेपर शीघ्र आध्यात्मिक उन्नति होनेमें सहायता होती है । इस दिन गुरुका तारक चैतन्य वायुमंडलमें कार्यरत रहता है । गुरुपूजन करनेवाले जीवको इस चैतन्यका लाभ मिलता है । गुरुपूर्णिमाको व्यासपूर्णिमा भी कहते हैं, गुरुपूर्णिमापर सर्वप्रथम व्यासपूजन किया जाता है । एक वचन है – व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वंम् । इसका अर्थ है, विश्वका ऐसा कोई विषय नहीं, जो महर्षि व्यासजीका उच्छिष्ट अथवा जूठन नहीं है अर्थात कोई भी विषय महर्षि व्यासजीद्वारा अनछुआ नहीं है । महर्षि व्यासजीने चार वेदोंका वर्गीकरण किया । उन्होंने अठारह पुराण, महाभारत इत्यादि ग्रंथों की रचना की है । महर्षि व्यासजीके कारण ही समस्त ज्ञान सर्वप्रथम हमतक पहुंच पाया । इसीलिए महर्षि व्यासजीको ‘आदिगुरु’ कहा जाता है । ऐसी मान्यता है कि उन्हींसे गुरु-परंपरा आरंभ हुई । आद्यशंकराचार्यजीको भी महर्षि व्यासजीका अवतार मानते हैं ।*


*🚩गुरुपूजन का पर्व-*


*गुरुपूर्णिमा अर्थात् गुरु के पूजन का पर्व ।*


*🚩वर्तमान में सब लोग अगर गुरु को नहलाने लग जायें, तिलक करने लग जायें, हार पहनाने लग जायें तो यह संभव नहीं है। लेकिन षोडशोपचार की पूजा से भी अधिक फल देने वाली मानस पूजा करने से तो भाई ! स्वयं गुरु भी नही रोक सकते। मानस पूजा का अधिकार तो सबके पास है।*


*🚩"गुरुपूर्णिमा के पावन पर्व पर मन-ही-मन हम अपने गुरुदेव की पूजा करते हैं.... मन-ही-मन गुरुदेव को कलश भर-भरकर गंगाजल से स्नान कराते हैं.... मन-ही-मन उनके श्रीचरणों को पखारते हैं.... परब्रह्म परमात्मस्वरूप श्रीसद्गुरुदेव को वस्त्र पहनाते हैं.... सुगंधित चंदन का तिलक करते है.... सुगंधित गुलाब और मोगरे की माला पहनाते हैं.... मनभावन सात्विक प्रसाद का भोग लगाते हैं.... मन-ही-मन धूप-दीप से गुरु की आरती करते हैं...."*


*🚩इस प्रकार हर शिष्य मन-ही-मन अपने दिव्य भावों के अनुसार अपने सद्गुरुदेव का पूजन करके गुरुपूर्णिमा का पावन पर्व मना सकता है। करोड़ों जन्मों के माता-पिता, मित्र-सम्बंधी जो न दे सके, सद्गुरुदेव वह हँसते-हँसते दे डा़लते हैं।*


*🚩'हे गुरुपूर्णिमा ! हे व्यासपूर्णिमा ! तु कृपा करना.... गुरुदेव के साथ मेरी श्रद्धा की डोर कभी टूटने न पाये.... मैं प्रार्थना करता हूँ गुरुवर ! आपके श्रीचरणों में मेरी श्रद्धा बनी रहे, जब तक है जिन्दगी.....*


*🚩आजकल के विद्यार्थी बडे़-बडे़ प्रमाणपत्रों के पीछे पड़ते हैं लेकिन प्राचीन काल में विद्यार्थी संयम-सदाचार का व्रत-नियम पाल कर वर्षों तक गुरु के सान्निध्य में रहकर बहुमुखी विद्या उपार्जित करते थे। भगवान श्रीराम वर्षों तक गुरुवर वशिष्ठजी के आश्रम में रहे थे। वर्त्तमान का विद्यार्थी अपनी पहचान बड़ी-बड़ी डिग्रियों से देता है जबकि पहले के शिष्यों में पहचान की महत्ता वह किसका शिष्य है इससे होती थी। आजकल तो संसार का कचरा खोपडी़ में भरने की आदत हो गयी है। यह कचरा ही मान्यताएँ, कृत्रिमता तथा राग-द्वेषादि बढा़ता है और अंत में ये मान्यताएँ ही दुःख में बढा़वा करती हैं। अतः मनुष्य को चाहिये कि वह सदैव जागृत रहकर सत्पुरुषों के सत्संग, सान्निध्य में रहकर परम तत्त्व परमात्मा को पाने का परम पुरुषार्थ करता रहे।*


*🚩संत गुलाबराव महाराजजी से किसी पश्चिमी व्यक्ति ने पूछा, ‘भारत की ऐसी कौनसी विशेषता है, जो न्यूनतम शब्दोंमें बताई जा सकती है ?’ तब महाराजजीने कहा, ‘गुरु-शिष्य परंपरा’ । इससे हमें इस परंपराका महत्त्व समझमें आता है । ऐसी परंपराके दर्शन करवानेवाला पर्व युग-युगसे मनाया जा रहा है, तथा वह है, गुरुपूर्णिमा ! हमारे जीवनमें गुरुका क्या स्थान है, गुरुपूर्णिमा हमें इसका स्पष्ट पाठ पढ़ाती है ।*


*🚩आज भारत देश में* 


*जाय तो महान संतों पर आघात किया जा रहा है, अत्याचार किया जा रहा है, जिन संतों ने हमेशा देश का मंगल चाहा है । जो भारत का उज्जवल भविष्य देखना चाहते हैं । लेकिन आज उन्ही संतों को टारगेट किया जा रहा है ।*


*🚩भारत में थोड़ी बहुत जो सुख-शांति, चैन- अमन और सुसंस्कार बचे हुए हैं तो वो संतों के कारण ही है और संतों, गुरुओं को चाहने और मानने वाले शिष्यों के कारण ही है ।*


*🚩लेकिन उन्ही संतों पर षड़यंत्र करके भारतवासियों की श्रद्धा के साथ खिलवाड़ किया जा रहा है ।*


*🚩"भारतवासियों को ही गुमराह करके संतों के प्रति भारतवासियों की आस्था को तोड़ा जा रहा है ।"*


*लेख, गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 


23 जुले भारतीय राष्ध्वज स्वीकृत

 ********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*२२ जुलै - भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला*

********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. 


२४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.


भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. 


एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४  आरे आहेत. 


मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण २:३ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.


ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.


मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो.


खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.


निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.


*फडकवण्याची नियमावली :*


भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मान पूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही,यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. 


राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की,तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.


संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो.प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.


राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की,मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात असावा.जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला,मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.


राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही,अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.त्यानुसार राजकीय व्यक्ती,केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.ध्वज कुठलेही वाहन,रेल्वे,जहाजावर लावला जाऊ शकत नाही.


ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.तसेच राष्ट्रध्वज गादी,रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्यात ठेवून फडकविला जातो.राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*******************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६