शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

बोधकथा

*************************
  *बोध कथा*
*************************
  *कर्म आणि भावना.*
----------------------------------------

  *कथा*

*एकदा एक बाई गायीला केळे खायला घालत होती.  पण गाय ते केळं खात नव्हती.  ती बाई परत -परत त्या गायी जवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती पण गाय केळं खायला तयार नव्हती.*

 शेवटी गाय वैतागली आणि ती  बाईला शिंगाने मारायला धावली.  तशी ती बाई पळून गेली. 
त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता.  तो गायीच्या जवळ येऊन बोलला, ' ती बाई एव्हढं प्रेमाने खाऊ घालत होती तर तु का  नाही खालस? 
तेव्हा गाय म्हणाली, ' आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमावण्या साठी मला खाऊ घालत होती.  एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. 

पुढे गाय बोलली,  ' *भुकेल्याला प्रेमाने सुखी भाकरी दिली तरी गोड  लागते.*  

जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *दुर्योधन* आहे. 
जो केवळ आपल्या माणसांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *युधिष्टीर* आहे. 
आणि जो  सर्वांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *श्रीकृष्ण* आहे. '

  *बोध*

 *तर लक्षात ठेवा पुण्य कर्म करण्याबरोबर भावना महत्वाच्या असतात*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: